नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – व्यभिचार हा गुन्हा ठरवणारे कलम ४९७ रद्द करण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरूवार) दिला आहे. पती हा पत्नीचा मालक नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. व्यभिचार हा गुन्हा ठरु शकत नाही. मात्र, जर एखाद्या व्यक्तीने जोडीदाराच्या विवाहबाह्य संबंधांमुळे आत्महत्या केली. तर ते आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठरतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.