वेळेत कर्जफेड करून पत वाढवा – अण्णा हजारे

0
343

मुंबई,दि.२९(पीसीबी) – घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करून स्वत:ची पत राखावी, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.भारतीय स्टेट बँकेचे नगरचे क्षेत्रीय कार्यालय तसेच पारनेर शाखेच्या वतीने तालुक्यातील ग्राहकांच्या चावडी मेळाव्याचे नुकतेच हजारे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

राळेगणसिद्धीप्रमाणे राज्यातील प्रत्येक गावाचा विकास झाला तर आपला देश सुजलाम सुफलाम होण्यास वेळ लागणार नाही. राळेगणप्रमाणे बँकांच्या तसेच शासनाच्या विविध योजना ग्रामस्थांनी राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे नमूद करतानाच प्रत्येकाने आनंदाच्या मागे न धावता नि:स्वार्थ भावनेने कार्य केल्यास निश्?िचत आनंदप्राप्त होईल असे ते म्हणाले.

बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक सुमध चव्हाण यांनी चावडी मेळाव्याची संकल्पना स्पष्ट करून अण्णांनी घडविलेल्या राळेगणसिद्धीप्रमाणे स्टेट बँक घडविण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे सांगितले. बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या कर्ज योजना, विमा योजना, पेन्शन योजना यांची माहिती देत ग्राहकांनी बँकेशी असलेले सबंध जपण्याचे अवाहन केले.