वीर सावरकरांबाबत संजय राऊत यांनी मांडलेले त्यांचे वैयक्तिक मत आहे ती पक्षाची भूमिका नाही

0
504

मुंबई, दि.१८ (पीसीबी) – वीर सावरकर यांना भारतरत्न देण्यावरुन जे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे ते त्यांचे वैयक्तिक मत आहे ती पक्षाची भूमिका नाही असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. इतिहासावरच किती दिवस बोलत बसायचे? असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. कोणताही वाद निर्माण करण्यापेक्षा ज्या स्वातंत्र्यासाठी ते लढले तो देश विकास करतो आहे का? याकडे लक्ष देण्याची गरज आहे असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. या भांडणातून बाहेर पडा आणि देशाच्या विकासासाठी काम करा असा सल्लाही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता दिला आहे.