मुंबई, दि. १ (पीसीबी) : मुंबईचे पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून काम करत आहेत, असा खळबळजनक आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
ते म्हणाले, “ घोटाळ्यांच्या प्रकरणात राज्य सरकार तपासात अडथळे निर्माण करत आहे. त्यामुळे आम्हाला केंद्राकडे जावे लागते. हसन मुश्रीफ यांच्या प्रकरणात नांगरे पाटील यांनी ठाकरे सरकारचा माफिया म्हणून काम करता येत नाही हे लक्षात घ्यावे. त्यांनीच मला तर बेकायदेशीररित्या घरात कोंडून ठेवले. तेच सूचना देत होते. कोल्हापूरला जाताना ज्या पद्धतीने मला रोखले त्याविरोधात किरीट सोमय्या यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार केली आहे.”