विश्वडासबंधुत्व वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना नोबेल पुरस्कार द्या; काँग्रेसची मागणी

0
572

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – धारावीमधील लोकांना चावणारा डास हा मातोश्रीवर येऊन मलाही चावतो, त्यामुळे धारावीकरांशी माझं रक्तांचं नातं आहे, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभेदरम्यान केलं होतं. या वक्तव्याचा काँग्रेसने चांगलाच समाचार घेतला आहे.

डासभाऊ हा शोध लावणारे उद्धव ठाकरे महान आहेत. त्यांना विश्वडासबंधुत्व वाढवण्याकरीता जागतिक नोबेल पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस करावी अशी मागणी करत काँग्रेसने उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

मुंबईकरांमध्ये सद्भभावना वाढावी, भाऊबंदकी वाढावी या उद्धात विचाराने डासांची पैदास केली जात होती. मात्र आम्ही उगाच शंका घेतली, असं म्हणत काँग्रेस प्रवक्ते सचिन सांवत यांनी टोला लगावला आहे.

मुंबईमधील वाढत्या डासांचा उपद्रवाला आम्ही मुंबई महापालिकेच्या कारभाराला दोष देत होतो. ते आमचे चुकलेच, असं म्हणत त्यांनी खिल्ली उडवली आहे.