जयपूर, दि. ६ (पीसीबी) – काँग्रेसने देशावर ६० वर्ष राज्य केले आहे. या साठ वर्षात ते अपयशी झाले असतानाच विरोधी पक्ष म्हणूनही ते फेल ठरले आहेत. काँग्रेसचे नेते कोणत्याही विषयाचा नीट अभ्यास करत नाहीत. कष्ट घेत नाहीत. त्यामुळे त्यांना खोटयाचा आधार घ्यावा लागतो,अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) राजस्थानच्या अजमेरमध्ये केली.
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या गौरव यात्रेचा समारोप मोदींच्या भाषणाने झाला. यावेळी ते बोलत होते.