Desh

विरोधकांनी पराभवानंतर ईव्हीएमवर खापर फोडण्याचे ठरवलंय; मोदींचा टोला  

By PCB Author

April 24, 2019

रांची, दि. २४ (पीसीबी) – विरोधकांनी निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ईव्हीएमवर खापर फोडण्याचा  निर्णय घेतला आहे, अशी माहिती मला मिळाली आहे,  असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार)  लगावला आहे.  झारखंडमधील प्रचारसभेत  मोदी  बोलत होते. 

सभेत बोलताना  मोदी म्हणाले की आधी विरोधक माझ्यावर टीका करत होते, पण कालपासून त्यांनी ईव्हीएमवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.  ज्याप्रमाणे एखादा विद्यार्थी परिक्षेत पेपर चांगला गेला नाही, तर पेन नीट चालत नव्हता , अशी कारण देतो, अशीच कारणे विरोधक देतील,  असा टोला  मोदी यांनी लगावला.

यावेळी मोदींनी श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. श्रीलंकेत दहशतवाद्यांनी चर्च आणि इतर ठिकाणी कशाप्रकारे दहशतवादी हल्ला केला हे तुम्ही पाहिले असेल. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतदेखील अशीच परिस्थिती होती, असे त्यांनी सांगितले.