नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससह विरोधी पक्षांनी एकत्र येऊन महागठबंधन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही एक अयशस्वी कल्पना आहे. यातील पक्ष हे एकमेकांसोबत नेहमी भांडत असतात. मात्र, जेव्हा त्यांना सरकार स्थापण्याची एखादी संधी दिसते, तेव्हा ते एकत्र येतात. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी या लोकांची पार्श्वभूमी सर्वांना सांगावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
मोदी अॅपवरुन ते कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते.