विरोधकांचे महागठबंधन म्हणजे अयशस्वी कल्पना – पंतप्रधान मोदी

0
411

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससह विरोधी पक्षांनी एकत्र येऊन महागठबंधन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही एक अयशस्वी कल्पना आहे. यातील पक्ष हे एकमेकांसोबत नेहमी भांडत असतात. मात्र, जेव्हा त्यांना सरकार स्थापण्याची एखादी संधी दिसते, तेव्हा ते एकत्र येतात. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी या लोकांची पार्श्वभूमी सर्वांना सांगावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

मोदी अॅपवरुन ते कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते.

आम्ही’ सुख वाटणारे आहोत, तर ‘ते’ समाज वाटणारे आहेत’, अशा शब्दांत मोदींनी   काँग्रेसवर टीका केली. आता ५ राज्यांमध्ये निवडणुका आहेत. त्यासाठी हे छोट्या-छोट्या गोष्टींसाठी तणावाचे वातावरण निर्माण करतील. एकमेकांमध्ये भांडणं लावून देतील, असेही ते म्हणाले.

मोदी पुढे म्हणाले की, अटलजींनी सगळ्यांना विश्वासात घेऊन छत्तीसगढ, झारखंड आणि उत्तराखंड राज्यांची निर्मिती केली होती. मात्र, काँग्रेसने तेलंगाणा आणि आंध्र प्रदेश राज्यांची विभागणी केली आणि एकच भाषा बोलणाऱ्या लोकांना एकमेकांचे शत्रू बनवून टाकले.