विनयभंग प्रकरणात नाना पाटेकरांना मोठा दिलासा  

0
399

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या विरोधात  विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. मात्र, या प्रकरणात नानाविरोधात कोणतेही पुरावे नाहीत, असा स्पष्ट उल्लेख असलेला बी समरी अहवाल ओशिवरा पोलिसांनी न्यायालयात दाखल केला आहे. यामुळे नानांना मोठा दिलासा मिळाला आहे.  

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यासह, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्दिकी आणि राकेश सारंग यांच्याविरोधात १० ऑक्टोबर या दिवशी मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. भारतीय दंडविधान कलम ३५४ आणि ५०९ अंतर्गत या कलाकारांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता.

‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रिकरणाच्या वेळी नाना यांनी विनयभंग केला, असा जाहीर आरोप तनुश्रीने गेल्या वर्षी केला होता. तिने दिलेल्या लेखी तक्रारीनंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशीअंती एफआयआरही नोंदवला होता.  मात्र, नानाविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे स्पष्ट  झाले आहे. यावर अभिनेत्री तनुश्री दत्ता  कोणती  भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल.