विज कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

0
369

जळगाव, दि.१२ (पीसीबी) – शेतात ज्वारी कापणीचे काम करत असताना अंगावर वीज पडून पाच जण ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना जळगावातील धरणगाव तालुक्यातील भवरखेडा गावात घडली.

रघुनाथ दशरथ पाटील (वय५०), अलका रघुनाथ पाटील (वय ४५), शोभा भागवत पाटील(वय३३), लता उदय पाटील (वय३०), कल्पना भैया पाटील (वय३५) रा. भवरखेडा, ता.धरणगाव) अशी या दुर्घटनेत ठार झालेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रघुनाथ पाटील यांच्या शेतात ज्वारी कापणीचे काम सरू होते. सर्वजण काम करत असताना दुपारी अचानक दुपारी ढगांच्या गडगडाटासह पावसाला सरूवात झाली. त्यामुळे सर्वजण एका झाडाच्या उभे होते. त्यांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत सर्वांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी धरणाव ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले.