‘विजयी भारत’; भाजपच्या विजयावर मोदींची पहिली प्रतिक्रिया

0
480

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाप्रणित एनडीए ३४३ जागांवर आघाडीवर आहे. देशातील जनतेने मोदी सरकारच्या बाजूने कौल दिला आहे. या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत, असे ट्विट मोदी यांनी केले आहे. पुन्हा एकदा भारताचा विजय, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

देशभरात मतमोजणीत भाजप ३०० जागांवर आघाडीवर असून या कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे. आपण सर्व जण मिळून भारत घडवूया, पुन्हा एकदा भारताचा विजय झाला, असे मोदींनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देखील ट्विटरवरुन विजयावर प्रतिक्रिया दिली. फिर एक बार मोदी सरकार, भारताचा आभारी आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. हा संपूर्ण भारताचा विजय असून भारताचे तरुण, गरीब, शेतकरी यांचा हा विजय आहे.