Maharashtra

वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना १०० मावळे अडचणीत आणतील – सुधीर मुनगंटीवार

By PCB Author

February 23, 2020

चंद्रपूर,दि.२३(पीसीबी) – वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना १०० मावळे अडचणीत आणतील, असं म्हणत माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वारिस पठाण यांना लक्ष्य केलं आहे . वारिस पठाण यांनी माफी मागितली असती, तर बरं झालं असतं, असं म्हणत जनता त्यांना माफ करणार नाही, असंही मुनगंटीवार यांनी नमूद केलं.

एमआयएम पक्षाचे आमदार वारिस पठाण यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य मागं घेतलं असलं, तरी थेट माफी मागितलेली नाही. यावरुन सुधीर मुनगंटीवार यांनी वारिस पठाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारच्या कामावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “सोमवारपासून (२४ फेब्रुवारी) सुरू होणाऱ्या अधिवेशनात ठाकरे सरकारने उत्तम निर्णय घेतले, तर आमचं त्यांना समर्थन राहणार आहे. आमच्या सोबत असताना केलेली २५,००० रुपये प्रति हेक्‍टर नुकसानभरपाईची मागणी आता त्यांनी खरी करुन दाखवावी. बारा तास मोफत वीज देण्यासोबतच २६ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर गौरव प्रस्ताव मंजूर करण्याचा विषय भाजप विधिमंडळात विषय लावून धरणार आहे.