Desh

वाराणसीतून पंतप्रधान मोदींचा ३ लाख ५० हजार मताधिक्याने विजय

By PCB Author

May 23, 2019

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. मोदी ३ लाख ५० हजार मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. 

वाराणसीमध्ये काँग्रेसने अजय रॉय यांना  मोदीविरोधात रिंगणात उतरवले होते. ही लढत एकतर्फी होईल, असे सुरूवातीपासून चित्र होते. त्याप्रमाणे   मोदींनी रॉय यांचा सहज पराभव केला आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. २०१४ पेक्षा विक्रमी मतांनी मोदींनी हा विजय संपादन केला आहे.  दरम्यान, देशभरात भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने मोठा  पक्ष ठरला आहे. भाजपने ३००चा आकडा  पार गेला आहे.