वाढत्या कोरोना संसर्गामुळे ‘या’ जिल्ह्यात आठ दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन जाहीर; एका दिवसात सापडले १५०० कोरोना रुग्ण

0
344

सांगली, दि.०४ (पीसीबी) : देशभरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असताना महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. त्यामुळे सांगलीत कोरोना संसर्गाचा कहर वाढल्याने सांगलीत आठ दिवसाचा तातडीचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. उद्या 5 मे रोजी मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन लागू करण्यात येत असून जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी तशी अधिकृत घोषणाच केली आहे. आपल्या सर्वांचा जीव वाचणं महत्त्वाचा आहे. त्यासाठीच हा लॉकडाऊन करण्यात येत असल्याचं जयंत पाटलांनी म्हंटलय.

सध्या सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १५०० वर पोहोचली असून सोमवारी ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बाब समोर आली. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेवून सांगली जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येत असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. कारण, सांगलीतील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.