वसईतील चिंचोटी धबधब्यावर ४० जण अडकले

490

पालघर, दि. ७ (पीसीबी) – पावसाचा जोर वाढल्यामुळे वसईतील चिचोटी धबधब्यावर पोहायला गेलेले ४० जण अडकले आहेत. यापैकी पाच जणांचा शोध घेतला जात आहे. तर उर्वरित ३५ जण झाडांच्या साहाय्याने उभे आहेत. या सर्वांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर मागवण्यात आले आहे.

चिंचोटी धबधब्यावर पायी जाण्यासाठी दोन तास लागतात. त्यामुळे वसईच्या तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे हेलिकॉप्टरची मागणी केली. या सर्वांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्यात येणार आहे. अडकलेले सर्व जण सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.