लोकसभा-विधानसभा एकत्र? महाराष्ट्राचा अहवाल लवकरच केंद्राला देणार

0
692

मुंबई, दि. २ (पीसीबी) – लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबत राज्य सरकार ४ महिन्यात केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहे. देशांत विविध निवडणुकांमुळे सुमारे ३१५ दिवस आचारसंहितेमध्ये जातात. याचा परिणाम राज्याच्या कामावर, प्रशासनावर, विकासावर होतो. म्हणूनच निवडणुका एकत्र घेण्याबाबत राज्य सरकार केंद्राला येत्या चार महिन्यात अहवाल देणार आहे.

निवडणुका एकत्र घेण्याबाबत प्रत्येक राज्याला अहवाल देण्याबाबतच्या सूचना केंद्राने केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुंगनटीवार यांचा समावेश असलेली दोन सदस्यीय समिती सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी आणि विविध संस्था यांच्याशी चर्चा करून अहवाल केंद्राला पाठवणार आहे.

कोणत्या राजकीय पक्षाच्या फायद्यासाठी नाही, तर दीर्घकालीन विचार करुनच हा अहवाल तयार करत असल्याचे समितीचे प्रमुख सुधीर मुंगनटीवर यांनी स्पष्ट केले.