पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – देशभरातील लोकसभेच्या ५४३ पैकी ५४२ मतदारसंघांत सात टप्प्यांत मतदान झाल्यानंतर आज (गुरूवारी) सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. राज्यात एकूण चार टप्प्यात मतदान झाले. त्यानंतर प्रत्येकाला निकालाची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर निकालाचा दिवस उजाडला आहे. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागांसाठी ८६७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या सर्वांचा फैसला आज होणार आहे.