लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यास काय कराल?; नरेंद्र मोदींनी दिले हे उत्तर

0
521

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यास काय कराल?, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारण्यात आला होता. अशीच वेळ आली तर मी झोळी उचलून कधीही निघायला तयार असेन, असे मोदी म्हणाले आहेत.

नरेंद्र मोदी “झी न्यूज” या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी संपादक सुधीर चौधरी यांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले आहे.

भाजपचा पराभव होणार नाही हेही तितकेच सत्य आहे. पुन्हा देशात आमचेच सरकार येईल. जनतेचा भाजप पक्षावर पूर्ण विश्वास आहे, असेही मोदी म्हणाले आहेत.

२०१४ च्या तुलनेत यावेळी भाजपच्या जागा वाढतील. तसेच सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचे स्वप्नभंग होणार आहेत, असेही ते म्हणाले.