नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – ‘मी टू’ मोहीम अधिक तीव्र झाल्यानंतर अनेक महिलांनी परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्यानंतर त्यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी केंद्र सरकारने त्यांना नायजेरिया दौऱ्यावरून तातडीने आज (गुरूवार) भारतात परतण्याच्या सुचना दिल्या आहेत.