Pimpri

लग्नास नकार दिल्याने तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

By PCB Author

October 16, 2020

चाकण,दि.१६(पीसीबी) – तरुणाने सुरुवातीला लग्नाचे आमिष दाखवले आणि प्रेम संबंध ठेवले. त्यानंतर तरुणाने लग्नाला नकार दिला. या कारणावरून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 22 सप्टेंबर रोजी झीत्राईमळा, चाकण येथे घडली. याबाबत 15 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेश्मा अनिल पवार (वय 28) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत वंदना अनिल पवार (वय 45, रा. कुरन, ता. जुन्नर) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजीम शेख (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी रेश्मा हिला आरोपीने लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून तिच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले. त्यानंतर आरोपीने रेश्मा हिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. यामुळे रेश्मा हिने 22 सप्टेंबर रोजी झीत्राईमळा येथे राहत असलेल्या भाड्याच्या खोलीत गळफास लाऊन आत्महत्या केली. याबाबत आरोपी अजीम शेख याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.