Notifications

लग्नासाठी स्त्री-पुरुषांची किमाय वय वेगवेगळी नको, समान ठेवा – कायदा आयोग

By PCB Author

August 31, 2018

नवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) – लग्नासाठी तरुण आणि तरुणीचं किमान वय समान ठेवा, अशी सूचना कायदा आयोगाने केली आहे. पुरुषांसाठी लग्नाचं वय २१ वर्ष आणि महिलांसाठी १८ वर्ष हे चुकीचे असल्याचे कायदा आयोगाने म्हटले आहे. लग्नासाठी पुरुषाचं वय स्त्रीपेक्षा जास्त असावे, असा समज आहे. पंरतु कायदेशीररित्या प्रौढ होण्याची वयोमर्यात १८ वर्ष आहे. त्यामुळे विवाहासाठी स्त्री आणि पुरुषांसाठी वयोमर्यादा वेगवेगळी ठेवणं हे योग्य नाही, असे आयोगाने म्हटले आहे.