लग्नाच्या वरातीत ट्रक घुसला, ८ जण जागीच ठार

0
423

लखीसराय, दि, ११ (पीसीबी) – भरधाव ट्रक लग्नाच्या वरातीत घुसल्याने ८ जण ठार झाले. तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून ट्रक चालक फरार झाला आहे. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. 

गावातून ही वरात आली असल्याचे समजते. त्यावेळी भरधाव ट्रक लग्नाच्या वरातीत घुसला. ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे वरातीतील १०-१५ लोक ट्रक खाली चिरडले गेले. त्याआधी हा ट्रक परिसरातील विजेच्या खांबाला जाऊन धडकला होता. या दुर्घटनेनंतर ट्रक चालक पळून गेला. घटनेत ८ जण जागीच ठार झाले असून ६ जखमींना स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केलीय.