राहुल गांधी मुर्ख आहेत, त्यांना राफेल कराराचे ज्ञान नाही –  रविशंकर प्रसाद भडकले

0
343

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर राफेल करारासंदर्भात केलेले आरोप आणि वापरलेल्या ‘चोर’ या शब्दावर केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षाने आक्षेप नोंदवताना राहुल गांधींनी केलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. ‘राफेल कराराबाबत खोटे आरोप करणारे राहुल गांधी हे मुर्ख असून त्याना आपल्याला शिकवावे लागेल’, अशा शब्दात केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर पलटवार केला आहे. गांधी घराणे भ्रष्ट्राचाराचे उगमस्थान असल्याचा आरोपही प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत केला.