राहुल गांधींना श्रीनगर विमानतळावर रोखले

0
335

श्रीनगर, दि. २४ (पीसीबी) – काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांना श्रीनगर विमानतळावरून दिल्लीला पाठवले होते. आता अशाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत करण्यात आला आहे.  आज (शनिवार) राहुल गांधी काँग्रेसच्या ११ नेत्यांसह काश्मीर दौऱ्यांवर गेले होते. परंतु त्यांना  परत दिल्लीला  पाठवण्यात आले आहे.

श्रीनगर विमानतळावर  राहुल गांधी यांना  रोखल्यामुळे विमानतळावरच मोठा  गोंधळ झाला.  त्यांना श्रीनगर विमानतळाहून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली.  यावेळी  राहुल गांधी यांच्यासोबत  गुलाब नबी आझाद, आनंद शर्मा, शरद यादव असे नेते सोबत होते.

दरम्यान,  जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर सध्या तेथील  परिस्थिती प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी काँग्रेस नेते दिल्लीहून श्रीनगरला गेले होते. येथे मीडियालाही या नेत्यांची मुलाखत किंवा भेट घेण्यास मनाई करण्यात आली आहे.