Maharashtra

“राहुलऐवजी मनमोहन सिंग राफेलवर बोलले तर मोदींचे बिंग फुटेल”

By PCB Author

October 15, 2019

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – राफेल विमानाच्या प्रकरणावर राहुल गांधी यांनी बोलण्यापेक्षा ज्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात या सौद्याची प्रक्रिया पुढे सरकत होती त्या मनमोहन सिंग यांनी संपूर्ण व्यवहाराबाबत देशाला माहिती दिली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बिंग फुटेल, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिले.

राहुल गांधींनी आपला सल्ला माना, असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र व राज्यातील सरकारवर टीका केली. भाजप सरकारच्या काळात बँकेतील सर्व सामान्यांचा पैसा असुरक्षित असल्याचा आरोप करीत हुकूमशाहीची भाषा वापरणाऱ्या भाजपविरोधात एकवटावे, असे सांगितले.

स्थानिक खासदार इम्तियाज जलील यांच्यावरही त्यांनी भेट नाव न घेता टीका केली. ओवेसी चांगले पण येथील त्यांचे साथीदार चुकीचे आहेत, असे म्हणत जलील यांनी औरंगाबाद – जालना स्थानिक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेला मदत केल्याचा आरोप अॅड. आंबेडकर यांनी केला. औरंगाबाद येथे जिल्हयातील वंचित आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते सोमवारी रात्री बोलत होते.