राष्ट्रवादीशी जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात – अशोक चव्हाण

0
724

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटपांवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीशी आमची सकारात्मक चर्चा सुरु आहे.   जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी   शनिवारी रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. या बैठकीला अशोक चव्हाण यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे आदी नेते उपस्थित होते. तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ हजर होते.

दरम्यान, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे रोज नवीनवीन विधान करत आहेत, त्याबद्दल कोणालाही गांभीर्य राहिलेले नाही. जनतेचा त्यांच्यावर विश्वासही राहिलेला नाही. त्यांना सत्ता प्रिय आहे, ते सत्तेसाठी त्याग करु शकत नाहीत, असा टोला अशोक चव्हाणांनी लगावला. निवडणुका जवळ आल्या की राम मंदिरचा विषय निघतो आणि निवडणुका संपल्या की विषयही संपेल, अशी टीका अशोक चव्हाण यांनी यावेळी केली.