पंढरपूर, दि. ९ (पीसीबी) – एखाद्या लाटेत निवडून आलेले सरकार फार काळ राहत नाही, असा इतिहास सांगतो. त्यामुळे जनतेचा विश्वास गमावलेल्या भाजप शिवसेनेचे आमदार- खासदार पुन्हा सभागृहात दिसणार नाही. तर येत्या १२ डिसेंबरनंतर राष्ट्रवादीमधून बाहेर गेलेल्या नेत्यांची घरवापसी सुरु होईल, असा दावा राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.