पंढरपूर, दि. २० (पीसीबी) – भीमा कोरेगाव दंगलीमध्ये सनातन्यांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही सनातन्यांची घुसघोरी झाल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. संभाजी भिडे यांना वाचविण्यात कोण पुढे आहेत, हे आम्ही दाखवून दिलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी युतीचा हात पुढे करण्यापूर्वी आत्मपरीक्षण करावे, असा टोला आंबेडकरांनी लगावला.