बीड, दि. ३ (पीसीबी) – राष्ट्रवादी पक्षातील पक्षांतराला थेट पक्षाध्यक्ष शरद पवारच जबाबदार आहेत. त्यांनीच भाकरी करपली. या वयात त्यांना होत असलेल्या कष्टामुळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कोणत्याही पक्षातील नेत्याला दुखःच होईल, असे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडीतील बरेच नेते शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यावर विनायक मेटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सर्वाधिक पक्षांतर केले आहे. यावर मेटे म्हणाला की, या पक्षांतराला शरद पवारच जबाबदार आहेत. भाकरी करपण्यासाठी स्वतः शरद पवारच जबाबदार आहेत. या वयात त्यांना होत असलेल्या कष्टामुळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कोणत्याही पक्षातील नेत्याला दुखःच होईल असे विधान केले आहे.
दरम्यान, विनायक मेटे हे सध्या युतीसोबत असून विधानसभा निवडणुकीत शिवसंग्रामने १२ जागांची मागणी केली आहे. परंतु अद्याप युतीचे जागावाटप जाहीर झालेले नाही. त्यामुळे शिवसंग्रामला नेमक्या किती जागा मिळतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.