राष्ट्रवादीचा राज्यात ५०-५० टक्के जागांचा प्रस्ताव; काँग्रेसच्या निर्णयाकडे लक्ष

0
592

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – मुंबईमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली. यावेळी राज्यात ५०-५० टक्के जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादीने काँग्रेसपुढे ठेवला आहे. या प्रस्तावावर काँग्रेसने भूमिका स्पष्ट केलेली नसून काँग्रेसच्या निर्णयाची राष्ट्रवादी प्रतिक्षा करत आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.