रावसाहेब दानवे यांच्यामुळेच नामचीन गुंडांना भाजपमध्ये प्रवेश; आमदार अनिल गोटेंचा आरोप

0
606

धुळे, दि. १४ (पीसीबी) – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यामुळेच  नामचीन गुंडांना पक्षात प्रवेश मिऴत आहे. तर मते वाढवण्यासाठी गुंडांना प्रवेश दिल्याचे  सांगितले जाते. भाजपचे केवळ सत्तेसाठी होत असलेले अध:पतन मन अस्वस्थ करणारे आहे. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध संघर्ष यात्रा काढली होती. आज ते हयात असते, तर तुम्ही असे धाडस केले असते का? असा  सवाल आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.