रायगडला राजधानीचा दर्जा द्यावा – खासदार अमोल कोल्हे

0
601

मुंबई, दि, २५ (पीसीबी) – सत्तराव्या व्या शतकात जशी रायगड राजधानी होती, तसेच आता रायगडला पुन्हा राजधानीचा दर्जा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत ही आग्रही मागणी केली आहे.

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली, लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे दिग्गज नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर अमोल कोल्हे यांनी पहिल्यांदाच लोकसभेत भाष्य केले.

त्यावेळी १७ व्या शतकात जशी रायगड राजधानी होती तशीच ती आताही करावी, अशी आग्रही मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली. इतकेच नव्हे तर, स्टॅच्यू ऑफ युनिटीप्रमाणे या वास्तू आपण जपायला हव्या. त्यांचे आपण संवर्धन करायला हवे, असेही कोल्हे यांनी म्हंटले.