रायगडमध्ये पुजेतील जेवणातून ६० जणांना विषबाधा; तीन लहान मुलांचा मृत्यू

0
787

रायगड, दि. १९ (पीसीबी) – रायगडमधील महड येथे पुजेतील जेवणातून तब्बल ६० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत तीन लहान मुलांचा मृत्यू झाला असून २५ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर पनवेलमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खालापूर तालुक्यातील महड येथील माळी कुटुंबाच्या घरी सोमवारी (दि.१८) वास्तूशांतीचा कार्यक्रम होता. पुजेनंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आटपून स्वगृही परतलेल्यांना रात्री उशिरा उलटी आणि मळमळण्याचा त्रास सुरु झाला.  ५० ते ६० जणांना विषबाधा झाल्याने सुरुवातीला सर्वांना खोपोलीतील रुग्णालयात नेण्यात आले.मात्र, तोपर्यंत  ३ लहान मुलांचा मृत्यू झाला होता. तर २५ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पनवेलमधील रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.