राम मंदिर बांधले नाही,तर भाजप सोडणार – साक्षी महाराज

0
550

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – आज भारतीय जनता पार्टीचे अस्तित्व आहे, ते भगवान रामाच्या आशीर्वादामुळे आणि राम मंदिर आंदोलनामुळे आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जर राम मंदिर बांधले नाही. तर भाजपच्या सदस्यतेचा राजीनामा देणार, अशी धमकी भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी दिली आहे. 

विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर बांधण्यावरून सरकारला इशारा दिला होता. सरकारने त्याचा सन्मान करायला हवा. राम मंदिर हा भारतातील लाखो लोकांच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे केंद्र सरकारने संसदेत याबातचा कायदा मंजूर करून घ्यावा. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राम मंदिर बांधावे,’ असेही साक्षी महाराज म्हणाले.

दरम्यान, राम मंदिर बांधण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने मोदी सरकारला ३१ जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. तोपर्यंत संसदेत कायदा झाला नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिला आहे.