राम मंदिरासाठी सरकारने कायदा करावा – मोहन भागवत

0
375

नागपूर, दि. २५ (पीसीबी) – राम मंदिराच्या उभारणीसाठी कायदा  करण्यासाठी  सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे.  त्यासाठी संपूर्ण समाज एकवटण्याचे काम आपल्याला करायचे आहे.  राम मंदिराच्या निर्माणानंतर सर्व भांडणे संपतील. त्यामुळे सरकारने आता लवकरात लवकर कायदा  करण्याची गरज आहे. न्यायालय निर्णय देत नसेल तर सरकारने कायदा करावा, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी  आज (रविवार) येथे केली.