मुंबई, दि. २० (पीसीबी) – देशातील प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करणे, हा निवडणूक जुमला होता. त्याप्रमाणे आता राम मंदिर उभारणार असल्याचे भाजप सतत सांगत आहे. त्यामुळे हा देखील जुमलाच आहे का? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मंदिर प्रत्यक्षात होण्यासाठी आपण निश्चित भुमिका घ्यायला हवी. हा मुद्दा केवळ निवडणूकांदरम्यान पुढे केला जातो आणि एकदा निवडणूका झाल्या की, त्याकडे पुन्हा कानाडोळा केला जातो, असे ठाकरे म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी देखील आता राम मंदिरावरुन राजकारण करण्यास सुरूवात केली आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून उध्दव यांनी भाजपवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. त्याचबरोबर देशात सध्या राम मंदिराच्या मुद्दावरच राजकारणाची चर्चा सुरू आहे. त्यावरुन अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.