जळगाव, दि. १९ (पीसीबी) – शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे निवडणुका लढले, तर त्यांना फटका बसेल. त्यामुळेच अखेरच्या क्षणी राम मंदिराच्या मुद्द्यावर आमचे एक मत झाले आहे, असे सांगून हे दोन्ही पक्ष युती करतील, असा दावा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज (शनिवार) येथे केला आहे.
जळगांवमध्ये राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या सभेत पवार बोलत होते.