मुंबई ,दि.२३(पीसीबी) -महाराष्ट्राच्या राजकारणात आज प्रचंड उलथापालथ झाली.आज सकाळी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
भाजपनं शिवसेनेला धडा शिकवला आहे, असं म्हणत रामदास आठवलेंनी शिवसेनेला टोला लगावला आहे. सर्व काही व्यवस्थित होईल असं अमित शहा सांगत होते आणि आता तसंच घडलं , अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. गेल्या आठवड्यात अमित शहांना मी भेटलो असं म्हणत त्यांनी चिंता करू नका असं सांगितलं. सर्व काही व्यवस्थित होईल असं ते आपल्याला म्हणाले असं असं आठवलेंनी म्हटलं.