राफेल करार प्रकरण; यूपीए सरकारनेच रिलायन्सशी बोलणी केल्याचे पुरावे – भाजपा

0
613

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – राफेल करारावरून टीका करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना चोर म्हटले. तसेच फ्रान्सने दिलेल्या अधिकृत स्पष्टीकरणाचाही संदर्भ त्याला जोडला आणि ओलांद यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हटले आहे असा दावा राहुल गांधी यांनी केला. देशाच्या पंतप्रधानाबाबत एकाही पक्षाच्या अध्यक्षाने कधीही अशाप्रकारे शब्द वापरून इतक्या खालच्या पातळीची टीका केलेली नाही. राहुल गांधी यांनी यावेळी मर्यादा सोडली असे केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. काँग्रेस घराणे हे भ्रष्टचाराचे माहेरघर आहे असा आरोप आता भाजपाने केला आहे. तसेच राहुल गांधी यांचे आरोपही भाजपा प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी खोडून काढले आहेत.