मुंबई, दि. २१ (पीसीबी) – काँग्रेसने राफेल करारावरुन केंद्र सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उद्योगपती अनिल अंबानी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहीले आहे. ‘काही स्वार्थी वृत्ती आणि व्यावसायिक स्पर्धकांनी काँग्रेसला चुकीची माहिती देत दिशाभूल करत आहेत’, असे अंबानींनी या पत्रात म्हटले आहे.