राज यांचे उद्धव-पवारांना पत्र; ‘ईव्हीएम’ला विरोध करण्याचे आवाहन

0
1258

मुंबई,  दि. २९ (पीसीबी) – आगामी निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान व्हावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. राज यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून ‘ईव्हीएम’ला विरोध करण्याचे आवाहन केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत बॅलेट पेपरवर मतदान घेतले तर भाजपची सत्ता येणे शक्य नाही, असे सांगणाऱ्या राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमविरोधात आवाज उठवला आहे. राज यांनी शरद पवार यांची भेट घेवून ईव्हीएमला विरोध करण्याचे आवाहन केले. तसेच रविवारी होणाऱ्या ईव्हीएम विरोधातील रॅलीला पाठींबा देण्याची विनंती केली. राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात याविषयी बराचवेळ चर्चा झाली. बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी आपण निवडणूक आयोगाकडे दाद मागू, असे आश्वासन शरद पवार यांनी राज यांना दिल्याचे समजते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमला उघडपणे विरोध करणारे राज ठाकरे हे पहिले नेते आहेत.