मुंबई, दि. १९ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संधीचे राजकारण केले आहे, किमान मनसे अध्यक्ष राज ठाकरे संधीसाधू नाहीत, असे काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे. युती झाली असली, तरी शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं?असा सवाल देवरा यांनी केला.
शिवसेनेने संधीसाधू राजकारण केले आहे. जेव्हा मोदींची लाट होती, तेव्हा सेनेने स्वतःचा फायदा करुन घेतला. जेव्हा मोदी विरोधात जनमत गेले तेव्हा त्यांच्यावर टीका केली, असा निशाणा देवरांनी शिवसेनेवर साधला.
मूळात मराठी माणसाला माहित आहे, शिवसेनेने काय केले! तीन पेंग्विन आणि शिव वडा व्यतिरिक्त सेनेने काहीच केले नाही. मिल कामगारांसाठी कोणी मिल खरेदी केल्या?’ असा प्रश्न करून मुंबईतील भाडेकरुंसाठी काँग्रेसने काम केले आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.