Maharashtra

राज ठाकरे मराठवाडा दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतणार

By PCB Author

February 14, 2020

औरंगाबाद, दि.१४ (पीसीबी) – राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा तीन दिवसांचा होता. मात्र ते उद्या सकाळीच मुंबईत परतणार आहेत. राज यांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मात्र यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

राज ठाकरे काल संध्याकाळी औरंगाबादला पोहोचले. ते १६ फेब्रुवारीला मुंबईला परतणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार त्यांचे कार्यक्रम ठरलेले होते. मात्र आता राज यांनी मराठवाडा दौरा गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे उद्या सकाळी मुंबईत परतणार आहेत. त्यामुळे त्यांचे उद्याचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राज ठाकरे उद्या पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेणार होते. ते शिक्षकांच्या संमेलनादेखील उपस्थित राहणार होते. याशिवाय काही हिंदुत्ववादी संघटना आणि प्रतिष्ठीत व्यक्तींनादेखील भेटणार होते.