राज ठाकरेंना गांभीर्याने घेऊ नका – मुख्यमंत्री फडणवीस

0
464

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – पाच राज्यांतील भाजपच्या पराभवानंतर  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करताना  पप्पू आता परमपूज्य झाला, असे म्हटले होते. या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे हे माझे चांगले मित्र आहेत. मात्र त्यांची राजकीय वक्तव्ये आणि व्यंगचित्रे गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे त्यांनी म्हटले आहे.