मुंबई, दि. १९ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह या जोडगोळीविरोधात महाराष्ट्रात सभांचा तडाखा लावला आहे. राज ठाकरेंच्या सभाच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरेंची तोफ थंड करण्यासाठी भाजपने कारवाया सुरू केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे राज ठाकरेंचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याचा डाव असल्याचा आरोपही मनसेकडून केला जात आहे.
राज ठाकरेंची भाषणे थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दिल्लीतून प्रेशर येत असल्याचा दावा मनसेने केला आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काही वकिलांची फौज जमा करून राज ठाकरेंच्या सभा कशा थांबवता येतील, यावर विचारमंथन केल्याचे मनसेचे म्हणणे आहे.