मुंबई, दि. १३ (पीसीबी) – राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत केवळ घोषणा केली आहे. प्रत्यक्ष कृती केलेली नाही. गेली चार वर्ष सरकार आंदोलनकर्त्यांना खेळवत आहे. गेल्या दोन आठवड्यापासून याठिकाणी आंदोलन सुरू आहे. मात्र, याठिकाणी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. आरक्षणाच्या मुद्यावरून अधिवेशनात आम्ही पहिल्याच दिवशी आक्रमक होऊ, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (मंगळवार) येथे दिला.