Maharashtra

“राज्य सरकारला केंद्राने आत्तापर्यंत २८ हजार १०४ कोटींची मदत केली”

By PCB Author

May 26, 2020

मुंबई, दि.२६(पीसीबी) – आज (दि.२६) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ४ वाजता पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती आर्थिक मदत केली त्याची माहिती दिली आहे.

केंद्र सरकारने कोरोना काळात निधी उपलब्ध करुन दिला नाही, असा राज्य सरकारने केला होता. आत्तापर्यंत 5 हजार कोटींपेक्षा जास्त पैसे राज्याला दिले आहेत. मात्र केंद्राने काहीही दिलेच नाही असं ठाकरे सरकारकडून भासवलं जातं आहे, असा आरोप फडणवीसांनी केलाय. पीपीई किट, N-95 मास्क यांचाही पुरवठाही केंद्राने केला आहे. तसेच आत्तापर्यंत 28 हजार 104 कोटींचा निधी केंद्राने राज्य सरकारला उपलब्ध करुन दिला आहे. तरीही केंद्राने काहीही दिलं नाही असं वारंवार सांगितलं जात आहे.

दरम्यान पीपीई किट, N-95 मास्क यांचाही पुरवठाही केंद्राने केला आहे. तसेच आत्तापर्यंत 28 हजार 104 कोटींचा निधी केंद्राने राज्य सरकारला उपलब्ध करुन दिला आहे. तरीही केंद्राने काहीही दिलं नाही असं वारंवार राज्य सरकार कडून सांगितलं जात आहे, असंही फडणवीस म्हणाले आहेत.