Notifications

राज्याला पाणीसंकटाचे चटके बसण्यास सुरूवात

By PCB Author

October 03, 2018

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – सप्टेंबरसोबतच मान्सूनपर्वही सरले असून ऑक्टोबरमधील उष्म्याच्या तडाख्याबरोबरच राज्याला पाणीसंकटाचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. वरुणराजाने पाठ फिरवल्याने यंदा सरासरीच्या ७७.४ टक्केच पाऊस झाला असून महाराष्ट्रातील १६४ तालुक्यांत ७५ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे.