Maharashtra

राज्यात ८ हजार पोलिसांच्या आणि ७ हजार सिक्युरिटी गार्डच्या जागा भरणार- अनिल देशमुख

By PCB Author

February 16, 2020

पुणे,दि.१६(पीसीबी) – मागील सरकारने गेल्या पाच वर्षात पोलिस भरती केली नव्हती. मात्र आम्ही आता पोलिसांच्या ८ हजार जागा तसेच सिक्युरिटी गार्डच्या ७ हजार जागा भरणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. अनिल देशमुख यांनी काल पुण्यात ही घोषणा केली.

अनिल देशमुख म्हणाले की, बलात्कार गुन्ह्यांबाबत आंध्र प्रदेश सरकारनं केलेल्या कायद्याचाही आम्ही अभ्यास करणार आहोत. त्यासाठी २० फेब्रुवारीला मी स्वतः आंध्र प्रदेशमध्ये जाणार आहे.

हिंगणघाटसारख्या घटना रोखता याव्यात यासाठी आंध्रप्रदेशमधील कायदा महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न करणार आहे, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.